जाहिरात
ताज्या घडामोडी

कारगिल शाहिदांना वाहिली आदरांजली

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,२६ जुलै)

गडचिरोली शहरातील कारगील चौक येथे कारगिल च्या युद्धात शहीद झालेल्या शूर वीरांना आदरांजली वाहिली आणि विजय दिवस साजरा करण्यात आला.
आदरांजली कार्यक्रम वेळी पाऊसाने हजेरी लावली,भर पावसात विजय दिन साजरा कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोली च्या वतीने साजरा करण्यात येणार आला.यावेळी नागरिक, युवक उपस्थित राहून देश भक्त शहीद सैनिकांना आदरांजली दिली.

सन १९९९ ला कारगिल येथे भारत पाकिस्तान यांचे युद्ध झाले होते. या युद्धात भारतीय शूरवीर सैनिकांनी प्राणाची बाजी लावून पाकिस्तानचा पराभव केला होता. या युद्धात शूरवीर सैनिकांनी बलिदान देशासाठी दिले होते त्यांच्या स्मृति कायम राहावी म्हणून कारगिल विजय दिन देशभरात मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो.

गडचिरोली शहरातील मागील २४ वर्षापासून कारगिल विजय दिवस नित्यनेमाने कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ चे अध्यक्ष उदय धकाते यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात येतो. त्यांच्याच पुढाकारने गडचिरोली शहरात कारगिल स्मारक ची निर्मिती करण्यात आली आहे.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर,मार्गदर्शक नरेंद्र चन्नावार, सुनील देशमुख, डॉ. नरेश बिडकर, दिलीप माणुसमारे, विलास जुवारे,सुनील बावणे, निखिल मंडलवार,विजय लोणार, रुपेश सलामे, महेंद्र मसराम, राजू डोंगरे आदी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button