ग्रामीण भागात घरकुलधारकाना रेती उपलब्ध करुन द्या,ग्रा प सदस्य तथा सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी
उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी
सावली तालुक्यातील ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल योजना अनेक दिवसापासुन असुन अनेक लोकांना घरकुल मिळाले आहे.पण रेती अभावी घरकुल बाधकामात अळथळा निर्माण झाल्याने अनेक घरकुल धारकाना मोठा त्रास होत आहे.सिमेंट, लोहा, विटा, गिट्टी यांचा भाव ही वाढून आहे त्यामूळे सामान्यांना योजनेच्या पैशातून घर बांधणे कठीण होऊन गेले आहे.घर बांधायचे असेल तर इकडून – तिकडून पैशाची जुळवा जुळव करावी लागते. अशातच रेती मिळणे ही अशक्य झाले असुन आणि समोर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घरकुल धारकांना रेती मीळत नसल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत असुन अनेक घरकुल धारकाना पाऊसाअभावी नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने घरकुल धारकाना पाच ब्रास रेती शासनाच्या जिआर नुसार घरकूल धारकांना उपल्बध करुन द्यावे अशी मागणी ग्रा. प .सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.
