गडचिरोलीताज्या घडामोडी
अन्नातून ५ जणांना विषबाधा, रुग्णांची प्रकृती बरी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२९ मे)
गडचिरोली शहरातील काल सायंकाळी एका मंगल कार्यालयातील लग्नसमारंभाच्या जेवनामधून ५ जणांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली असल्याने गडचिरोली शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सद्या ५ जणांची प्रकृती बरी आहे.
गडचिरोली येथे काल एका लग्न समारंभात जवळपास लग्नानंतर ३०० लोकांनी जेवण केले ,पण त्यापैकी ५ जणांना काल मध्यरात्री पासून उलट्या,जुलाब ची लागण झाली. त्या ५ जणांना मध्यरात्री शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असता त्यांची तपासणी केले असता डॉक्टरांनी त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती दिली.
जाहिरात
