नरभक्षक वाघाचे तात्काळ बंदोबस्त करुन जेरबंद करा,अन्यथा तिव्र आंदोलन, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाची न्यासाची मागणी
जिल्हाधिका-या मार्फत मुख्यमंञी व वने सचिवाना निवेदन
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा व गडचिरोली वनविभागात मागील वर्षभरात नरभक्षक वाघाने अनेक निष्पाप लोकावरती प्राणघातक हल्ले करुन जवळपास २३ नागरीकांचे बळी घेतल व अनेकाना जखमी केलेे व या संदर्भात नरभक्षक वाघाला जेरबंद करण्या करीता लोकशाहीच्या मार्गाने भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन तथा परीसरातील जनतेच्या वतिने ठिय्या,मोर्चा,जेलभरो असे आंदोलन करण्यात आले.परंतू नरभक्षक वाघाला पकडण्या करीता वनविभाग पुर्णत: अपयशी ठरला.या मध्ये पोर्ला वनपरीक्षेञात नरभक्षक वाघाच्या संबधाने व्यापक जनजाग्रुती झाली नसल्याने जास्तीत जास्त नरभक्षक वाघाने माणसाचे बळी घेतले. याला सर्वस्वी जबाबदार पोर्लाचे वनपरीक्षेञाधीकारी आहेत.यानी वाघाच्या बंदोबस्ता करीता लाखो रुपयाचा निधी घेतला परंतू त्याचा वापर कुठ झालेला आहे हा चिंतेचा विषय आहे.तेव्हा सदर निधीची चौकशी करुन वनपरीक्षञअधिका-यावर मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करावा व वनविभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे नरभक्षक वाघ दिवसेदिवस अनेक लोकांचे बळी घेत असुन वनविभाग पुर्णत: निष्क्रीयता दाखवित आहे.वाघाला पकडण्या करीता कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे दिसुन येत आहे. नुकतेच मौजा धुंडेशिवनी येथील खुशाल निकुरे व दिबना येथील एका व्यक्तीचे नरभक्षक वाघाने बळी घेतलेला आहे.परीसरात शेतकरी बांधवामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असुन एैन हंगामाच्या वेळी कास्तकार शेतावर जाण्यास घाबरत आहेत.तसेच विद्यार्थी शाळेत जाण्यास घाबरत आहेत.नरभक्षक वाघाच्या हल्यातील एकुण २३ बळी जनतेतून गेलेले आहेत.तेव्हा शासन, प्रशासनाने तात्काळ गांभीर्याने गडचिरोली जिल्ह्यातील एकुण नरभक्षक वाघाचे बंदोबस्त करुन त्यांना जेरबंद करावे व नरभक्षक वाघाच्या हल्यात ठार झालेल्या कुटूंबियाना प्रतीव्यक्ती ५०,०००००/- (पन्नास लाख) रुपये एकमुस्त रक्कम नुकसानभरपाई म्हणुन द्यावे व नरभक्षक वाघाच्या दहशतीत ज्यांचे पिक गेले त्या शेतक-याना एकरी २५०००/-रुपये नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे ,जिल्हा सचिव फुलचंद वाघाडे,गडचिरोली तालुकाध्यक्ष रविन्द्र शेलोटे,शहर प्रमुख भास्कर नरुले यानी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना यांचे मार्फत मुख्यमंञी एकनाथजी शिन्दे,उपमुख्यमंञी देवेन्द्रजी फडणविस,सचिव वने यांना लेखी निवेदनुातून केली आहे.तसेच ,वनसंरक्षक गडचिरोली यांना निवेदन दिले असुन येत्या आठ दिवसात नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात आले नाही तर लोकशाहीच्या मार्गाने भ्रष्टाचार विरोधी जनआंदोल न्यास तथा परीसरातील जनतेच्या वतिने मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धरने तथा मोर्चा असे तिव्र आंदोलन केल्या जाणार असल्याचे ज्ल्हध्यक्ष विजय खरवडे यांनी सांगीतलं याबाबर राज्याचे मुख्यमंञी,उपमुख्यमंञी,सचिव वने याना लेखी निवेदन देण्यात आले.
