आरोग्य
गर्भनिरोधकांच्या वापरात मोठी वाढ – देशातील तरूण पिढीला का नकोत मुलं
उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाने आपला पाचवा अहवाल प्रसिद्ध केला. यासाठी आरोग्य मंत्रालयाने भारतातील सर्व राज्यात सर्वेक्षण केलं आहे.
सर्वेक्षणानुसार भारतात आता प्रत्येक महिलेला सरासरी 2 मुलं आहेत. गेल्या सर्वेक्षणा पेक्षा आता घट झाली आहे तसेच देशातील तरूण पिढीला लवकर मुलं नाही पाहिजे असं दिसतंय.
आता भारतात गर्भनिरोधकांचा वापर वाढल्याचं दिसून आले. 2015 मध्ये 54 टक्के लोकांनी गर्भनिरोधकांचा वापर करत होते, तर 67 टक्के लोक आता गर्भनिरोधक पद्धत वापरत आहेत.
जाहिरात
