जाहिरात
गडचिरोलीशेतकरी व्यथा

भुमी अभिलेख कार्यालयाच्या पुनरमोजणीचा फटका,24 जूनपासुन 75 वर्षीय शेतकरी उपोषणावर

खासदार,आमदार यांच्या पत्राची अधिकारी दखलच घेत नाही

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि, 11 जून)

मौजा गडचिरोली येथील जुना सर्वे नंबर 548/2,549/2 (0.60) हेक्टर आर ही शेती मी 1995 साली घेतलेली आहे, फेरफार क्रमांक 912,913 असून माझ्या शेतीवर मला न विचारता व मला साधा पत्रही न देता भूमी अभिलेख कार्यालयाने पुनरमोजणी च्या नावाखाली नवीन सातबारा नंबर 513/1 (0.36) व 528/1 (0.24) मुळ मालकाच्या नावाने बनवले. त्यामुळे मला अजूनही त्या कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत त्या कारणाने मी नाइलाजास्तव उपोषणाचा मार्ग स्वीकारत असल्याची माहिती पीडित शेतकऱ्याने दिलेल्या आपल्या उपोषणाच्या पत्रात नमूद केली आहे व दप्तर दिरंगाई च्या कायद्यानुसार दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी या मागणीसाठी शेतकरी 24 जून पासून उपोषण करणार आहे.

सुनावणी….
सदर प्रकरणी 2 नोव्हेंबर 2023 ला उपविभागीय अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सर्व लगत धारक शेतकऱ्यांच्या उपस्थित सुनावणी घेण्यात आलेली आहे. सुनावणीस भूमी अभिलेख कार्यालयातील जिल्हा अधीक्षक यांचेसह,वरिष्ठ लिपिक व ३ भुकर मापक,यांचेसह उपविभागीय अधिकारी कार्यालयातील उपविभागीय अधिकारी तसेच दुरुस्ती लिपिक यांचे सह गडचिरोलीतील तलाठी सुद्धा हजर होते.यांच्या समक्ष सुनावणी घेण्यात आली व काही त्रुटी पूर्ण करून 8 दिवसात प्रकरण सादर करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली ला उपविभागीय कार्यालयाने अवगत केले.

शेतकऱ्याने सातबारा दुरुस्तीसाठी जोडलेली कागदपत्रे
¶¶¶
सातबारा दुरुस्ती बाबत मुळ अर्ज, जुना सातबारा नंबर 548/2 व 549 /2,  शेती घेतली त्याचे खरेदी पत्र 1995 ची,फेरफार नंबर,912,913 रि नंबरिंग परचा,पी-वन,पी-नाइन, बंदोबस्त मिसाल, नकाशा, विलंब माफी अर्ज,सर्व लगत धारकांचे सातबारा सर्व दस्तऐवज जोडून अर्ज सादर केला आहे.

खासदार, आमदार यांच्या पत्राकडे अधिकारी करतात जाणीवपूर्वक दुर्लक्ष
¶¶¶
सदर शेतकऱ्याला कार्यालयाचे कुठलेही हेलपाटे न मारता त्याचे काम पूर्ण व्हावे याकरिता माजी खासदार अशोक नेते यांनी २ पत्र कार्यालयाला पाठवले त्याचप्रमाणे आमदार डॉ.देवराव होळी यांनी शेतकर्यांचे काम पूर्ण होण्यासाठी ३ पत्र दिले पण अधिकारी त्यांच्या पत्राची दखल घेत नसल्याचे दिसून आले आहे.

उपविभागीय अधिकारी कार्यालय व भूमी अभिलेख कार्यालय यांच्यात ताळमेळ चा अभाव
¶¶¶
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली तथा तालुका उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली यांच्याकडून शेतकऱ्यांची दुरुस्तीची प्रकरणे उपविभागीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठवली जातात पण त्याकडे या कार्यालयात समन्वयाचा अभाव असल्याच्या कारणाने त्या कार्यालयातील कर्मचारी भूमी अभिलेख कार्यालयातून आलेल्या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात व अनेक शेतकऱ्यांची दुरुस्ती ची प्रकरणे दोन-दोन,पाच-पाच वर्ष अशी प्रकरण निकाली निघत नाही.

आनंदराव गणुजी कांबळे वय 75 वर्ष
शेतकरी
¶¶¶
जो पर्यंत माझा सातबारा भूमी अभिलेख कार्यालयातून सुधारणा होत येऊन येत नाही तोपर्यंत मी माझे उपोषणावर ठाम आहे व माझ्या जीवाला काही कमी जास्त झाल्यास सर्व जिम्मेदारी भूमी अभिलेख कार्यालयाची राहील.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button