म्हसली येथील अपंग लाभार्थी 5 टक्के अपंग निधी पासून वंचित, ग्रामपंचायत चे दुर्लक्ष संपूर्णपणे करत डोळेझाक
प्रतिनिधी- प्रवीण वाघे,
नेरीवरुन जवळ असलेल्या म्हसली येथील अपंग लाभार्थी अपंगांच्या 5 टक्के निधी पासून वंचित असून त्यांना कुठलाही लाभ मिळाला नाही याबाबत अपंगांनी ग्रामपंचायतीला माहिती देऊनही ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असून अपंगांच्या प्रश्न कडे संपूर्णतः डोळेझाक करताना दिसत आहे .
तालुक्यातील म्हसली हे छोटेसे गाव असून आदर्श गाव आहे या गावात ग्रामपंचायत निवडणूक न घेता अविरोध सदस्य निवड करून शासनाचा पुरस्कार प्राप्त केलेले गाव आहे परंतु गाव तसा चांगला पण वेशीवर टांगला अशी अवस्था गावात बघावयास मिळत आहेत ग्रामपंचायत च्या मनमानी कारभारामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून अपंगांना लाभ मिळाला नाही याबाबत अपंगांनी माहिती सुद्धा दिली परंतु हेतुपुरस्सर एका अपंग लाभार्थ्यांला लाभ देण्यात आला अशी माहिती मिळाली असून बाकीच्यांना विचारले सुद्धा नाही ही सरपंचंची सूडबुद्धी असली पाहिजे असे लाभार्थी चर्चा करीत आहेत.
सदर निधीची तरतूद सरकारने 5 टक्के अपंग लाभार्थ्यांना केले आहे ग्रामपंचायत वित्त आयोग आरखडयातून मंजूर करून त्या निधीतून उपलब्ध करून लाभार्थ्यांना वितरित केल्या जाते किंवा ग्रामपंचायत च्या सामान्य फंडातून हा निधी उपलब्ध करुन दिल्या जाते याबाबाबत ग्रा प ठरविते परंतु मागील दोन वर्षांपासून ग्रामपंचायत प्रशासन याकडे काणाडोळा करताना दिसत आहे व अपंगावर अन्याय करताना दिसत आहे तेव्हा या मनमानी कारभाराची दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न अपंगांसमोर निर्माण झाला आहे तसेच गावात अनेक समस्या निर्माण झाल्या असून शाळे चा संमस्या चा प्रश्न सोभोवताल सर्वत्र पाणीच पाणी इमारतीला भेगा सर्वत्र घाण यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याकडे सुद्धा ग्रा प चे दुर्लक्ष आहे नेहमीच मनमर्जी कारभारामुळे ग्रा प दोन सदस्यांनी राजीनामा सुद्धा दिला आहे असे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे तेव्हा संबंधित विभागाने या ग्रामपंचायत प्रशासन च्या मनमर्जी कारभाराला चाप बसवून अपंगांना लाभ मिळवून देऊन शाळेच्या व इतर समस्या सोडवाव्या अशी मागणी अपंग लाभार्थीनी केली आहे.
