उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज
सिंदेवाही वनपरीक्षेत्र अंतर्गत उपवनपरीक्षेत्र नवरगाव अंतर्गत येत असलेल्या रत्नापुर बीट आहे.सदर रत्नापुर गावासभोवताल कोणताही जंगल परीसर नसुन सर्वत्र शेत-शिवार परीसर आहे. तरीपण या परीसरातुन वार्ड क्र ५ असलेल्या शांताराम कारमेंगे रत्नापुर येथे पहाटेच्या सुमारास थेट गोठयात शिरून बिबट्याने गोरीवर हल्ला केला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सविस्तर वृत्त असे की, नवरगांव शहरापासून २ किमी अंतरावर असलेल्या रत्नापुर येथे शांताराम कारमेंगे यांचे वार्ड नं ५ येथे गोठा आहे.
शांताराम कारमेंगे हे शेतकारी असून यांच्याकडे स्वमालकीच्या गायी-गोरी आहेत.३/५/२०२२ एप्रिलच्या सायंकाळी नेहमीप्रमाणे कारमेंगे यांनी आपल्या गुरांना झोपण्याआधी गोठयात बांधले व झोपायला निघुन गेले. पहाटे अंदाजे ३ ते ४ वाजेच्या सुमारास बिबट्या ने गोरीवर हल्ला केला.आणि त्यामधे बिबट्याने ठार केले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही . या आधी अनेकदा बिबट्याने थेट गावात शिरून कित्येकांच्या घरचे गायी, शेळया , बकराचा सुद्धा जीव घेतला आहे.घटनास्थळी वनक्षक जितेंद्र वैद्य रत्नापुर, यांनी दाखल होवुन पंचनामा केला. जंगल परीसर सोडुन गावात वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याचे चित्र या घटनेने दिसून येते आहे.त्यामुळे मानव व जंगली प्राणी यांचा सघर्ष होवुन जिवित हाणी होवु शकते.तरी वनविभागाने बिबट्याचा योग्य बंदोबस्त करुन गावाला भयमुक्त करावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
